Tuesday, 7 October 2014

मोदीनि सत्ता प्रस्तापित केली ते खरचं जनतेचे पंतप्रधान



ज्या प्रकारे २०१४ च्या लोकसभा निवडणुका  मध्ये मोदीनि सत्ता प्रस्तापित केली ते खरचं
जनतेचे पंतप्रधान आहे असे भारतीय जनतेला वाटत असेल .
          आज पर्यंत जेवढे पंतप्रधान भारतात होऊन गेले त्यामध्ये इंदिरा गांधी वगळता कोणत्याही
पंतप्रधानाची लोकप्रियता येवढी नसेल जेवढी आज नरेद्र मोदी यांची आहे . त्यांचे भाषण
 
हे भावनिक करणारे असले तरीही त्यांचे नेतृत्व  हे वाखन्या जोगे आहे . ज्या प्रकारे तीन वेळेला सतत गुजरातचे मुख्यमंत्री राहिल्या नंतर पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून भाजपणी त्यांच्यावर विश्वास ठेवून निवडणूक लढली त्या त्यांच्या पक्षाला हि अभिमान असेल कि असा नेता त्यांना भेटला पण फारच कमी वेळेत त्यांनी देशवासियांन सोबतच अनिवासी भारतीयांचीहि मने जिंकली आहेत . पंतप्रधान झाल्यानंतरचे १५ ऑगस्ट चे भाषण , मंगळयांनाच्या यशस्वी मार्गक्रमना नंतरचे इस्रो मधील भाषण व अमेरीकेमधील मेडिसन स्वेअर ला केलेले भाषण यामुळे त्यांनी देशवासियान सोबतच अनिवासी भारतीयाची मने जिंकली आहे .
       मेकिंग इन इंडिया , स्वच्छ भारत अश्या उपक्रमान मुळे खरच असे वाटत आहे कि पंतप्रधानाला देशातील जनतेचे व देशासाठी काही तरी करण्याची प्रबळ इच्छा आहे . त्याचं बरोबर मित्र राष्ट्रासाठी उपग्रह निर्माण करण्याची त्यांची इच्छा यामुळे असे वाटते कि २१ व्या शतकात भारत एक महासत्ता होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. असेच कार्य ते करत राहोत हीच प्रत्येक भारतीयांची इच्छा आहे . टीका करणारे तर करत रहाणार परंतु कधी तरी एखादा प्रमाणिक व प्रबळ इच्छा शक्ती असलेला खंभीर पंतप्रधान भारताला लाभला आहे याचेच समाधान वाटते .

No comments: